Breaking

Saturday, September 12, 2020

मुंबईचा अवमान: संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद https://ift.tt/3mjCCNa

मुंबई: ‘ठाकरे’ आणि 'पवार' हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे,' असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते, खासदार यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या निमित्तानं यांनाही साद घातली आहे. 'सामना'तील रोखठोक सदरात मुंबई विषयी लिहिलेल्या लेखात राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केलं आहे. 'महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रात भाजप उभा राहतो हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. वाचा: 'राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,' असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांनाही साद घातली आहे. वाचा: कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत,' असा इशारा राऊत यांनी दिला आहे. भाजपला चोख प्रत्युत्तर मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत कशी, अशी विचारणा करणारे भाजपचे नेते आशिष शेलार यांनाही राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 'भाजप नेत्यांचा इतिहास कच्चा आहे. मोरारजी देसाई यांच्या आदेशाने जशी मुंबईत मराठी माणसे शहीद झाली तसे गुजरातमध्येही १६ गुजराती बांधव शहीद झाले. शिवाय या गोळीबाराविरोधात पंडित नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकणारे चिंतामणराव देशमुख काँग्रेसवालेच होते. पण गोळीबाराचे आदेश देणाऱ्या मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण आडवाणींपर्यंत सर्व जनसंघीय दिग्गज सामील होते, हे विसरता येणार नाही. प्रत्येक इतिहासाला एक काळी बाजू असतेच. त्यामुळं तो खरवडत बसण्यात अर्थ नाही,' असा टोला राऊत यांनी हाणला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2FfJhaN

No comments:

Post a Comment