Breaking

Friday, December 4, 2020

...तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! https://ift.tt/2IeVUEv

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज हे दावे पूर्णपणे विश्वासार्ह मानता येणार नाहीत. त्यामुळे या वैद्यकीय निकषांची पूर्तता होईपर्यंत लसीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे याकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच डॉक्टरांच्या (आयएमए) या संघटनेने लक्ष वेधले आहे. 'आयसीएमआर'सारख्या संस्थेने राष्ट्रीय पातळीवरच्या लसीला तातडीने मंजुरी दिली, तरीही या लसीच्या उत्पादन स्थळापासून ते केंद्रापर्यंत राखणे अत्यावश्यक आहे. (Coronavaccine) भारतातील ज्या ग्रामीण भागामध्ये विजेची समस्या आहे, तिथे शीतसाखळी कशी ठेवणार हा प्रश्न निर्माण उपस्थित झाला आहे. त्यामुळे विजेची अडचण निर्माण झाली तर या ठिकाणी जनरेटरचा बॅकअप असायला हवा, आवश्यक तापमान राखण्यासाठी सुविधांसह वाहतूक करणारी वाहने नसतील तर त्यांचे आऊटसोर्सिंग करावे लागले, सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांना कमी तापमान पातळी राखण्यासाठी रेफ्रिजरेशन कोल्ड स्टोरेज तयार करण्याची गरज आहे. भारतात अनेक ठिकाणी या सुविधा नाहीत. त्यामुळे राज्य सरकारकडून या सुविधांची उपलब्धता होण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जावा लागेल. डीप फ्रिजिंग यंत्रणा विजेवर चालतात. मुंबईसारखी शहरे वगळता इतर ठिकाणी अखंडित वीजपुरवठा नाही. त्यामुळे या लसीकरण मोहिमेसाठी लागणारा वेळ आणि आर्थिक खर्चाचा अतिरिक्त भार वाढणार आहे. तसेच भारतातील १३० कोटी जनतेचे लसीकरण करण्यासाठी सरकारी कर्मचारी पुरे पडणार नाहीत. त्यामुळे सरकारने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचीही गरज भासू शकते किंवा सरकारी रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालयांनाही या लसीकरण कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावे लागेल, याकडे डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने लक्ष वेधले आहे. मुंबईत लसींची साठवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन होत आहे. शीतसाखळ्या उपलब्ध करण्याची तयारीही सुरू आहे. यामध्ये सीरिंजचा आकार किती आहे त्यानुसार साठवणूक क्षमताही ठरवण्यात येईल. सर्व रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांमधून ही माहिती गोळा करण्यात येत आहे. लसीची साठवणूक, वितरणाची व्यवस्था तसेच लस देण्यासंदर्भातील वेळापत्रक सरकारने जाहीर करावे, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या अपेक्षा - लसीकरण हे वय, लिंग, गट, हवामान, भौगोलिक परिस्थिती यानुसार वर्गवारी करून करण्यात यावे. - तिसऱ्या टप्प्यातील चाचणी न झालेली लस सुरक्षित मानता येणार नाही. - लस दिल्यानंतर अंगावर पुरळ उमटण्यापासून अॅनाफायलेक्टिकपर्यंत कोणत्याही प्रकारचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्याचा विचार व्हावा - औषध कंपन्याचा दावा कोणताही असला तरीही या दाव्याला आंतरराष्ट्रीय -राष्ट्रीय स्वरूपातील वैज्ञानिक संशोधनाद्वारे मान्यता मिळायला हवी. - लसीविषयक जागृती गरजेची. सोप्या, सहज वैज्ञानिक भाषेमध्ये हा विषय समजावून सांगायला हवा


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gcnWNf

No comments:

Post a Comment