कोलंबो: भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार ३८ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादवच्या ५० आणि शिखर धवनच्या ४६ धावांच्या जोरावर भारताने लंकेसमोर विजयासाटी १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. पण त्यांचा डाव १२६ धावा संपुष्ठात आला. चार विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्कार दिला गेला असला तरी सर्वांची मने जिंकली ती हार्दिक पंड्याने... वाचा- सामना सुरु होण्यापूर्वी भारताच्या हार्दिक पंड्याने अशी एक कृती केली ज्याने सर्व श्रीलंकेच्या चाहत्यांचे मन जिंकले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडू राष्ट्रगीतासाठी उभे होते. भारताचे राष्ट्रगीत झाल्यावर जेव्हा यजमान श्रीलंकेचे राष्ट्रगीत सुरू झाले आणि कॅमेरा हार्दिक पंड्याकडे गेला तेव्हा तो लंकेचे राष्ट्रगीत गाताना दिसला. वाचा- श्रीलंकेचे राष्ट्रगीत गात असल्याचे पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले. फक्त श्रीलंका नाही तर भारतीय चाहत्यांनी देखील त्याचे कौतुक केले. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली होती. पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार शिखर धवनने डाव सावरला. त्याने प्रथम संजू सॅमसन सोबत संघाचे शतक पूर्ण करून दिले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने अर्धशतक करून संघाला १६४ धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रीलंकेचा डाव १८.३ षटकात १२६ धावात आटोपला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या तर दीपक चाहरने दोन विकेट घेतल्या. अन्य सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rzqzys
No comments:
Post a Comment