आबुधाबी : महेंद्रसिंग धोनी हे एक अजब रसायन आहे आणि त्याचे देशप्रेम सर्वांनाच माहिती आहे. धोनीने आता एक अशी गोष्ट केली आहे की, त्याने फक्त एकाच कृतीने सर्वांची मनं आता जिंकवून घेतली आहेत. धोनीने फक्त एक कृती करत सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत...सध्याच्या घडीला पैशांचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. आयपीएल असो किंवा भारतीय क्रिकेट संघ सर्व ठिकाणी पैसाच बोलतो, असे म्हटले जाते. पण या सर्वांमध्ये अपवाद ठरला आहे तो धोनी. धोनीकडे आता भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे मार्गदर्शकपद देण्यात आले आहे. भारतीय संघ कोट्यवधी रुपये प्रशिक्षकांसाठी खर्च करतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण धोनीने जेव्हा भारतीय संघाचे मार्गदर्शकपद स्विकारले तेव्हा एकही पैसा घेतला नसल्याचे आता समोर आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी धोनीने एकही पैसा घेतलेला नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीदेखील हीच गोष्ट जाहीर केली आहे. ही गोष्ट जेव्हा क्रिकेट चाहत्यांना समजली तेव्ही त्यांनी धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कारण या मोठ्या पदासाठी धोनीला करोडो रुपये मागता आले असते आणि बीसीसीआयने ते दिलेही असते. पण भारतीय संघाच्या या महत्वाच्या पदासाठी धोनीने एका पैशाचीही मागणी केलेली नाही. धोनीचा अनुभव हा भारतासाठी सर्वात महत्वाचा ठरणार आहे. कारण धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने २००७ साली पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली होती. त्याचबरोबर धोनीने २०११ साली विश्वचषकही भारताला जिंकवून दिला होता. त्यामुळे धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे धोनीचा हा अनुभव नक्कीच भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर धोनी भारतीय संघातील सर्व खेळाडूंना जवळून ओळखतो, त्यामुळे त्यांच्या खेळात कसा बदल करायचा, हे धोनीला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे धोनी हा सर्व खेळाडूंच्या जवळ जाणारा ठरू शकतो. त्याचबरोबर भारतीय संघात दरी निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे, ही दरी कमी करण्यासाठी धोनी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BCiE7O
No comments:
Post a Comment