Breaking

Saturday, October 9, 2021

परतीच्या पावसाचा तडाखा; वीज कोसळल्याने एक शेतकरी ठार, तर दोन जखमी https://ift.tt/3Dqm5Pw

सोलापूर: मेघगर्जनेसह पडलेल्या मुसळधार पावसात वीज अंगावर पडल्याने मोहोळ तालुक्यात तीन ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्यात एक शेतकरी ठार झाला असून इतर दोघेजण जखमी झाले आहेत. शिवाय विजेच्या धक्क्याने एक म्हसही मृत्युमुखी पडली आहे. (one farmer lost life and two injured in in solapur district) तालुक्यातील तांबोळे येथे बाळू गोविंद सरवदे आणि त्यांचा भाऊ प्रकाश गोविंद सरवदे हे तांबोळे हद्दीतील शेतावर काम करत होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी बाळू सरवदे यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर बंधू प्रकाश जखमी झाले आहेत. क्लिक करा आणि वाचा- याच दरम्यान पोखरापुरात मारुती कडाप्पा लेंगरे हे दरवाजात उभे असताना वीज त्यांच्यासमोर दरवाज्यात कोसळल्यावर धक्का बसल्याने ते बाजूला कोसळले. त्यावेळी दरवाजाचा लोखंडी खीळा डोक्यात घुसल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- तर, तिसऱ्या घटनेत कोन्हेरी येथील शेतकरी जनार्धन महिपती मुळे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर वीज पडली. त्यात त्यांची दुभती म्हैस मृत्युमुखी पडली. सध्या सोलापूर जिल्ह्यात परतीचा मान्सून दाखल झाला असून तो मेघगर्जनेसह बरसत आहे.शिवाय विजांच्या कडकडाटात वीज कोसळण्याचे प्रमाणही विलक्षण वाढले आहे.त्यामुळं शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mH5dwY

No comments:

Post a Comment