Breaking

Wednesday, January 5, 2022

पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट होता!; भाजपने जारी केला स्फोटक व्हिडिओ https://ift.tt/3zsSTXl

नवी दिल्ली: यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्याने मोठे वादळ उठले असून यामागे खूप मोठे षडयंत्र होते, असा दावा करत भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यासाठी भाजपने अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक व्हिडिओच जारी केला आहे. ( ) वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये दाखल झाले. फिरोजपूर येथे त्यांचा कार्यक्रम होता. मात्र तिथे पोहचण्याआधीच पाकिस्तान सीमेपासून जवळ असलेल्या येथे पंतप्रधानांचा ताफा निदर्शकांकडून रोखण्यात आला. साधारण २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच ठिकाणी होता. त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर कोणताही धोका न पत्करता पंतप्रधान माघारी फिरले व त्यांनी आपले पुढील कार्यक्रम रद्द केले. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी याप्रकरणी राज्यसरकारला गंभीर इशारा दिला असतानाच भाजपचे अनेक मंत्री आणि नेत्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवर तोफ डागली आहे. त्याचवेळी भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून त्यात, पंतप्रधानांवर हल्ला करण्याचे पाकिस्तान, खालिस्तानी समर्थक आणि काँग्रेसचे कारस्थान हाणून पाडले गेले, असे म्हटले आहे. वाचा: 'मोदींवरील हल्ल्याचा घटनाक्रम' या शिर्षकाखाली भाजपने २.६ मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात पंतप्रधानांच्या दौऱ्याचा घटनाक्रम देण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे अनेक गंभीर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. भाजपने व्हिडिओद्वारे विचारले प्रश्न आणि केले गंभीर आरोप: - पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ल्याची योजना कोणी आखली होती? मोदींवर हल्ल्याचा प्लान पाकिस्तानचा होता का? मोदींवर हल्ल्याचे षडयंत्र खालिस्तान्यांचे तर नव्हते ना? या पूर्ण कटात कोणाची साथ होती? यामागे काँग्रेसने तर साथ दिली नाही ना? - चार जानेवारी रोजी मोदींचा फिरोजपूरचा कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली गेली. ५ जानेवारी रोजी कार्यक्रमाला जाणाऱ्यांना धमकावले गेले. फिरोजपूरला जाणाऱ्या गाड्या रोखण्यात आल्या. भाजपचे झेंडे हटवण्यात आले. - पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने जाणार होते तो रस्ता क्लीयर असल्याचे सांगण्यात आले. नंतर निदर्शकांना रस्त्यावर उतरवण्यात आले. पंतप्रधानांचा ताफा २० मिनिटे रोखून धरण्यात आला. पंजाब सरकारशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी फोनवर बोलणे टाळले. - पंतप्रधान मोदी अशा स्थितीत पुढे गेले असते तर काय घडले असते? दंगल घडवायची होती, हल्ला करायचा होता की रक्तपात घडवायचा होता? - पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याचे तर कारस्थान रचले नव्हते ना? तिथून माघारी परतल्यानंतर पंतप्रधानांनीच सत्यकथन केलं आहे. 'मी विमानतळावर जीवंत परतू शकलो यासाठी तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा', असे पंतप्रधान तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले. - पाकिस्तान, खालिस्तानी समर्थक आणि काँग्रेसचे कारस्थान हाणून पाडले गेले. देशाला दंगलीच्या वणव्यात ढकलण्याचा काँग्रेसचा खेळ पुन्हा एकदा उघड झाला. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qRBfbJ

No comments:

Post a Comment