Breaking

Thursday, March 3, 2022

महाविकास आघाडीला सुधीर जोशी यांचा विसर; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल https://ift.tt/qQ7Yhrz

भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांना विधानसभेत श्रद्धांजली म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यात निधन झालेल्या अनेक मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांसारख्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री सुधीर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यास महाविकास आघाडी सरकारला विसर पडल्याचे दिसून आले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू झाले असून, विधानसभेत भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शोकप्रस्ताव मांडला. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, माजी मंत्री नारायण पाटील, माजी विधानसभा सदस्य गजानन बाबर, विश्वासराव पाटील, नरेंद्रसिंग पाडवी, आशाताई टाले यांना शोकप्रस्तावाद्वारे सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. मात्र या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली तरी शिवसेनेचे जोशी यांचे नाव नव्हते. विधान परिषदेत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली जोशी यांचे अलिकडेच निधन झाले असून त्यांनी मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी संभाळली होती. त्याशिवाय विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते, शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. शिवसेनेच्या जडणघडणीत सुधीर जोशी यांचा महत्त्वाचा वाटा होता. विधान परिषदेतही आदरांजली विधानपरिषदेच्या सभागृहातही दिवंगतांना शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह समजले जाते. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात अनमोल कर्तबगारी केलेल्या दिवंगत मान्यवरांचा शोकप्रस्ताव अवघ्या काही मिनिटात पूर्ण झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याचा उल्लेख करून समाज आणि देशाच्या विकासात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. शोकप्रस्तावानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल विधानसभेत सादर करण्यात आलेल्या शोक प्रस्तावात जोशी यांचे नाव नसल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे कळते. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडे त्यांनी विचारणा केल्याचे समजते. तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून माहिती मागविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iJuFax

No comments:

Post a Comment