![](https://maharashtratimes.com/photo/95074278/nbt-video.jpg)
मुंबई : सूर्यकुमार यादवचा झंझावात यावेळी वानखेडेवर पाहायला मिळाला. सूर्याच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर यावेळी रोहित शर्माला वाढदिवशी विजयाचे गिफ्ट मिळाले. राजस्थानच्या २१३ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अडखळत झाली. पण सूर्या फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचा नूर बदलला. त्यानंतर टीम डेव्हिडने अखेरच्या षटकांत तीन षटकार खेचले आणि संघला विजय मिळवून दिला.राजस्थानच्या २१३ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. बर्थडे बॉय रोहित शर्मा यावेळी फक्त तीन धावावंर बाद झाला. त्यानंतर इशान किशनही २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे समीकरणच बदलले. सूर्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्याची आणि कॅमेरून ग्रीनची जोडी काही काळ जमली. पण ग्रीन ४४ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर सूर्या आणि तिलक वर्मा यांची जोडी जमली. सूर्याने त्यानंतर आपले अर्धशतक २४ चेंडूंत पूर्ण केले आणि मुंबईच्या विजयाचा मार्ग प्रशस्थ केला.राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय किती योग्य होता. कारण एकामागून एक राजस्थानच्या संघाला धक्के बसत होते. सलामीीर जोस बटलर यावेळी १८ धावावंर बाद झाला, त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन हा १४ धावांवर आऊट झाला. राजस्थानला त्यानंतर तिसरा धक्का हा देवदत्त पडीक्कलच्या रुपात बसला आणि त्याला फक्त दोन धावा करता आल्या. एकामागून एक राजस्थानचे फलंदाज कमी धावांत बाद होत होते. पण त्या सर्वांची कसर यावेळी भरून काढली ती यशस्वी जैस्वालने. कारण या सामन्यात यशस्वी हा एक राजस्थानचा एकच असा फलंदाज होता, ज्याची तोड मुंबईच्या गोलंदाजांकडे नव्हती. यशस्वी यावेळी आपल्या घरच्या मैदानात गोलंदाजांवर तूटन पडत होता. यशस्वीने जलदपणे अर्धशतक झळकावले. त्यानंतर तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण यापूर्वी एकदाही त्याला शतक करता आले नव्हते. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. त्यामुळे यशस्वीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण यशस्वी आपल्याच फलंदाजीत मग्न होता आणि एकाग्र चित्त ठेवत त्याने आपले पहिले वहिले शतक झळकावले. यशस्वी जैस्वालने यावेळी आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले आणि राजस्थानला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. यशस्वीला अखेर मुंबईच्या अर्शद खानच्या गोलंदाजीवर आऊट झाला, पण बाद होण्यापूर्वी त्याने आपले काम चोख बजाले होते. यशस्वीने यावेळी ६२ चेंडूंत १६ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर १२४ धावांची तुफानी खेळी साकारता आली. यशस्वीच्या शतकाच्या जोरावर राजस्थानच्या संघाला यावेळी मुंबईपुढे २१३ धावांचे आव्हान ठेवता आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LuipZl3
No comments:
Post a Comment