Breaking

Wednesday, September 2, 2020

बापरे! महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या; 'या' राज्यांनाही टाकलं मागं https://ift.tt/3jCCMgH

मुंबई: आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. २०१९मध्ये राज्यात १३.६ टक्के लोकांनी आत्महत्या केली आहे किंवा त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. राज्यात वर्षभरात आत्महत्या किंवा अपघातामुळे १८ हजार ९१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूत १३ हजार ४९३ लोकांनी आत्महत्या केली आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये १२ हजार ६६५ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्नाटकमध्ये ११२८८, उत्तर प्रदेशात ५४६४, राजस्थानात ४५३१, बिहार ६४१, झारखंड १६४६, छत्तीसगड ७६२९, ओडिशा ४५८२, मध्यप्रदेश १२४५७ आणि गुजरातमध्ये ७६५५ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे बिहारमध्ये सर्वात कमी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंच्या प्रकरणी गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात काहीही बदल झालेला नाही. राज्यात २०१७मध्ये १३.६ टक्के, २०१८मध्ये १३.४ टक्के आणि २०१९मध्ये १३.६ टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर तामिळनाडूत दरवर्षी हा आकडा कमी होत आहे. कर्नाटकमध्येही आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली असून मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील स्थिती मात्र जैसे थे असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QRGsPj

No comments:

Post a Comment