Breaking

Wednesday, November 11, 2020

त्यातले सत्य काय ते नितीश कुमारांनाच माहीत; शिवसेनेचा टोला https://ift.tt/35otn89

मुंबई: 'बिहार निवडणुकीच्या मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यांत गोंधळ घालून सत्ताधाऱ्यांनी काही ‘जागा’ लाटल्या. निवडणूक अधिकारी नितीशकुमारांच्या सूचनांचे पालन करीत होते, असा आरोप होत आहे. त्या आरोपांवरून शिवसेनेनं आता संयुक्त जनता दल व भाजपवर टीका केली आहे. ' यांनी केलेल्या आरोपांतील सत्य काय ते नितीशकुमारांनाच माहीत,' असा सूचक टोला शिवसेनेनं हाणला आहे. ( taunts over results of Bihar Elections) बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं कवित्व थांबण्यास तयार नाही. निकालानंतर तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक करणाऱ्या शिवसेनेनं आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून मतमोजणीतील घोळ व भाजपच्या राजकीय खेळीवर बोट ठेवलं आहे. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल. ओवेसी हे मोदी किंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारमध्येही तोच आरोप झाला. ओवेसींच्या उमेदवारांमुळं तेजस्वी व त्यांच्या आघाडीचे किमान १५ उमेदवार पराभूत झाले. या १५ जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा: 'चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले. चिराग यांनी जनता दलाच्या विरोधात जे उमेदवार उभे केले त्यामुळे नितीशकुमार यांच्या २० उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता. असा विषारी प्रचार तेजस्वी यादवही करत नव्हते. इतके असूनही पंतप्रधान मोदी यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत,' याकडंही शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे. 'नितीशकुमार मुख्यमंत्री होणं हा लोकमताचा अवमान' 'बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण लोकांचा तसा कौल नाही. बिहारमध्ये भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळालंय. त्यात नितीशकुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38z4EzW

No comments:

Post a Comment