नवी दिल्ली : करोनाविरुद्ध लस बनवणारी देशातील प्रमुख कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (CEO ) यांनी लस निर्मात्यांच्यावतीनं सरकारकडे एक विनंती केलीय. महामारीच्या या काळात लस निर्मात्यांना कायदेशीर पेचातून लांब ठेवायला हवं, असं पूनावाला यांनी म्हटलंय. 'कार्नेगी इंडिया'च्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत बोलताना पुनावाला यांनी ही मागणी समोर मांडलीय. लस निर्माते भारत सरकारसमोर ही गोष्ट लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या दरम्यान कोव्हिड १९ व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवताना येणाऱ्या अडचणींचाही पाढा वाचला. महामारीच्या या काळात जेव्हा काही फोल दावे केले जाऊ लागतात आणि माध्यमांद्वारे आणखीनंच गोंधळ उडतो तेव्हा 'लशीमुळे हे घडलं' अशी भीती लोकांच्या मनात तयार होते. या भीतीवर मात करण्यासाठी सरकारनं पुढे येऊन लोकांपर्यंत योग्य गोष्टी पोहचवायला हव्यात, असंही त्यांनी म्हटलं. 'सर्व प्रकारच्या कायदेशीर दाव्यांपासून बचावासाठी उत्पादकांना, विशेषत: लस उत्पादकांना सरकारी कवच मिळायला हवं', असं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेत सरकारनं प्रत्यक्षात अशा संरक्षणाची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलंय. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या महिन्यात लस चाचणीत सहभागी झालेल्या चेन्नईमधील एका ४० स्वयंसेवकानं लशीचा साईड इफेक्ट झाल्याचा दावा केला होता. लशीमुळे आपल्या मज्जासंस्था आणि स्मरण शक्तीला इजा पोहचल्याचं म्हणत या व्यक्तीनं कंपनीकडे पाच कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. त्यानंतर सीरमकडूनच या व्यक्तीवर चुकीचा दावा केल्याचा खटला दाखल करत १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला. दरम्यान, देशात करोना रुग्णांच्या संख्येनं शनिवारी एक कोटीचा आकडा पार केलाय. देशात करोना रुग्णांची संख्या एक कोटी चार लाख ५९९ असून, त्यातील ९५ लाख ५० हजार रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेनंतर रुग्णसंख्या एक कोटीपेक्षा अधिक होणारा भारत हा दुसरा देश आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nA2apz
No comments:
Post a Comment