Breaking

Monday, January 25, 2021

अरेरे! वर्षभरात ५० हजार लसी वाया https://ift.tt/2MrDNN3

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई कोणत्याही प्रकारच्या लसीकरणामध्ये दहा टक्के साठा विविध कारणांमुळे उपयोगामध्ये येत नाही. करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी वापरात येणाऱ्यांपैकी ३६५ लशी विनावापर राहिल्या. राज्यामध्ये विविध प्रकारच्या जाण्याचे मागील एक वर्षातील प्रमाण हे जवळपास पन्नास हजार इतके आहे. केंद्र सरकारने मार्च २०१९ ते एप्रिल २०२० या कालावधीमध्ये कोणत्या लसींचा वापर राज्यामध्ये करण्यात आला नाही यासंदर्भात दिलेल्या माहितीमध्ये वापरण्याजोग्य नसलेल्या लसींचे प्रमाण हे उपलब्ध लशींच्या तुलनेमध्ये एक टक्क्यांहून कमी असल्याचे दिसून येते. या आकडेवारीनुसार, डीपीटी लसींचा २८ लाख ४ हजार ८०५ इतका साठा आला होता. त्यातील २५९८ लसी वापरण्याजोग्या नव्हत्या. पेन्टाव्हॅलन्ट लशीच्या ४४ लाख एक हजार ९७९ पैकी ५२०९, ओपीव्हीच्या ८४ लाख एक हजार २५५ लसींपैकी १३ हजार ८२६, टीटीच्या २४ लाख ८७ हजार २२८ पैकी ४,६८५, डीटी लसींमधील १७ लाख ९७ हजार ६९८ पैकी ५६३, बीसीजीच्या ३० लाख १४ हजार ८०८ लसींपैकी ५११२ तर मिजल्सच्या ७४ लाख सहाशेपैकी २९२५, हेपॅटायटिस बीच्या ११ लाख २७ हजार ६४९ पैकी ६८४ लसी वापरलेल्या नाही. टायफॉइडच्या १ लाख २० हजार ५०० लशींचा पूर्ण वापर झाला तर व्हिटॅमिन के च्या २ लाख ३१ हजार ८७० लशींचा पूर्ण वापर करण्यात आला. शीतसाखळी नियोजन महत्त्वाचे लसीकरणामध्ये शीतसाखळीचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. लसीच्या गुणवत्तेनुसार तापमान ठेवायला हवे, अन्यथा ती लस उपयुक्त ठरत नाही. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लशीसाठीही सरकारने निर्देश दिले आहे. त्यामध्ये एका ठराविक तापमानापेक्षा अधिक काळ लसीची साठवणूक केली तर त्याचा बर्फ होतो, असे बर्फाचे पाण्यात रूपांतर झालेली लस वापरण्यायोग्य राहत नाही, असेही यात नमूद केले आहे. काही वायल्समध्ये डोळ्यांना न दिसणारे अदृश्य कण असतात, तर काही वायल्स तुटलेल्या असतात. एका ठिकाणाहून दुसरीकडे त्या आणताना वायल्स तुटू शकतात. या सगळ्या शक्यता लसीकरणाच्या वेळी लक्षात घ्याव्या लागतात, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. आर.एन. पाटील यांनी सांगितले. 'काळजी घेणे आवश्यक' कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असते. लसींची गुणवत्ता आणि किंमती, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन लशी वाया जाऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाहतूक व्यवस्था, शीतसाखळ्यांचे नियोजन या प्रत्येक बाबीमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qUfyX8

No comments:

Post a Comment