Breaking

Sunday, January 24, 2021

मुंबई महापालिकेसाठी MIM चीही तयारी; 'या' राज्यातून आमदार प्रचाराला येणार https://ift.tt/3c9xclo

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली असल्याने एमआयएमनेही कंबर कसली आहे. बिहारमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आणि मते पक्षाकडे खेचण्यासाठी एमआयएमने त्यांच्या बिहारमधील पाच आमदारांना मुंबईत पाचारण केले असून आमदारांची ही फळी बिहारी आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या आपल्या ताब्यात रहावी यासाठी शिवसेना, भाजप यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका वर्षानुवर्षे शिवसेनेच्या ताब्यात असली तरी गेल्यावेळी भाजपने ८०पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले होते. आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेल्याने या दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच असेल. शिवसेनेचे नेतृत्वच राज्याचेही नेतृत्व करीत असल्याने मुख्यमंत्री स्वत: या निवडणुकीत प्रचारासाठी उतरणार आहेत. भाजपच्यावतीनेही केंद्रातील काही मंत्र्यांना तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील काही मुख्यमंत्र्याना मुंबईत प्रचारासाठी बोलावले जाणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीही मुंबईतील बहुभाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी इतर राज्यातील नेत्यांना प्रचारात उतरविण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर एमएमआयमनेही निवडणुकांची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. एमआयएमला बिहारमध्ये अनपेक्षित यश मिळाल्याने पक्षाचा उत्साह दुणावला असून त्यांनी आता मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त बळ निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाने बिहारमधील पाच आमदारांना मुंबईत बोलावले असून त्यांनी मुंबईतील बिहारी आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. मुंबईत बिहारमधील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून विशेषत: उपनगरांमधील अनेक महापालिका वॉर्डामध्ये बिहारी मते निर्णायक आहेत. शिवाय बिहारमधील एकाही प्रादेशिक पक्षाचा मुंबईत बोलबाला नसल्याने बिहारी जनतेचा आवाज बनण्यासाठी एमआयएमची धडपड सुरू आहे. तयारीचा आढावा बिहारी जनतेला आपलेसे करून घेण्यासाठी एमआयएमचे हे पाचही आमदार वस्त्यांमध्ये खास बिहारी शैलीत मतदारांशी संवाद साधत आहेत. मुंबईत मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असून अनेक मतदारसंघात ते उमेदवारच निवडून येत असल्याने या वॉर्डांवर एमआयएमने सर्वाधिक नजर आहे. महापालिका निवडणुकीला अजून एक वर्ष असले तरीही आधीपासूनच कामाला लागली आहे. सत्ताधारी शिवसेनेसोबत काँग्रेस कधी नव्हे ते सत्तेत सहभागी झाल्याने काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडण्यासाठी एमआयएमने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. योग्य नियोजन आणि मोर्चेबांधणी करून बिहारप्रमाणेच मुंबईतही यश संपादन करण्यावर एमआयएमचा भर आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आमची तयारी सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठीच आम्ही मुंबईत आलो आहोत, अशी माहिती एमआयएमचे बिहारमधील आमदार अख्तरुल ईमान यांनी प्रसारमाध्यमांना दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3c9muLU

No comments:

Post a Comment