म. टा. प्रतिनिधी, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक-आगार परिसरात विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा नियम सरकारने तयार केला. यासाठी रेल्वे स्थानकांवर मार्शलची नियुक्ती करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ५०० रुपयांऐवजी १०० ते २०० रुपयांवर 'तोडपाणी' होत असल्याची माहिती समोर आली आहे. दंडाची रक्कम ठरलेली असताना, त्यानुसार कारवाई होत नाही. ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांनी दिल्यास त्याची पावती संबंधिताला देण्यात येत नाही. मार्शलकडून नियमांची अमंलबजावणी होत नसेल, तर नियमावली कशाला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वाचा: रेल्वे स्थानकांत विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने मार्शलची नियुक्ती केली आहे. १ ते १३ एप्रिल या काळात पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकात एकूण १,४४८ विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून एक लाख ७८ हजार १०० रुपयांचा वसूल करण्यात आला. १२ एप्रिल रोजी १०० रुपये याप्रमाणे वसुली करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शहरातील करोना बाधितांच्या संख्येत हजारोंनी वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होत आहे. डॉक्टर, आरोग्यसेवकांपासून ऑक्सिजन बेड, आयसीयू सर्वांचा तुटवडा जाणवत आहेत. ही स्थिती असूनही मोठ्या संख्येने प्रवासी विनामास्क वावरत आहेत. वाचा: फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एकूण १०,९८९ विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून १७ लाख २३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महिना-विनामास्क प्रकरण-दंड वसुली फेब्रुवारी... ४,०१७... ६,२९,६०० मार्च... ६,९७२... १०,९३,५०० १३ एप्रिलपर्यंत... १,४४८... १,७८,१००
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Q7tQXk
No comments:
Post a Comment