म. टा. प्रतिनिधी, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चार वेळा समन्स बजावूनही माजी गृहमंत्री चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतरच समन्स बजावण्याची तयारी 'ईडी'ने सुरू केली आहे. राज्याचे गृहमंत्री असलेल्या देशमुख यांनी १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त यांनी केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 'ईडी'च्या बलार्ड पिअर येथील प्रादेशिक संचालनालयाने अनिल देशमुख व त्यांचा मुलगा ऋषिकेश याला आतापर्यंत चारवेळा चौकशीसाठी समन्स बजावले. पण ते उपस्थित राहिले नाहीत. 'ईडी'च्या सूत्रांनुसार, देशमुखांच्या शोधासाठी ईडीचे पथक त्यांच्या काटोल येथील घरी गेले होते. पण तेथेही ते सापडले नाहीत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत तूर्तास समन्स बजावले जाणार नाही. देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती 'ईडी'ला मिळाली आहे. त्यामुळेच देशमुख व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीतील ४.२१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र अनिल देशमुख व त्यांचा मुलगा ऋषिकेश या दोघांचीही चौकशी होऊ न शकल्याने या प्रकरणाचा तपास अपूर्ण आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rWgZpB
No comments:
Post a Comment