मुंबई: 'ब्रेक द चेन'अंतर्गत नवी नियमावली जाहीर करत राज्य सरकारने राज्यातील २२ जिल्ह्यांना सूट देतानाच ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले. अथक प्रयत्न करूनही या ११ जिल्ह्यांमधील करोनाची रुग्णसंख्या अपेक्षनुसार घटताना दिसत नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे या ११ जिल्ह्यांपैकी ४ जिल्ह्यांची स्थिती तर चिंता करण्यासारखी असल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आले आहे. या ४ जिल्ह्यांमध्ये जास्त आढळून आल्याने त्यााबाबत आरोग्य विभागाने महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ( is higher in , , and districts of the state) ज्या जिल्ह्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये , , आणि सातारा अशा ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या चार जिल्ह्यांमध्ये करोनाचा पॉझिटीव्हीटी दर अधिक असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाने आता या चारही जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. क्लिक करा आणि वाचा- पुणे, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांनाही दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. करोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- पुण्यातील पुरंदर तालुक्यात आढळलेल्या झिकाचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्याबाबतही आरोग्यमंत्री टोपे यांनी माहिती दिली आहे. पुण्यात पाहणीसाठी केंद्र शासनाकडून तीन सदस्यीय पथक आहे अशी माहितीही टोपे यांनी दिली. या भागात डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणांनुसार उपचार केले जात असल्याचेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या आजाराचे संक्रमण झालेले नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना केल्या जात आहेत, असे सांगताना झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AfeqSz
No comments:
Post a Comment