Breaking

Monday, September 6, 2021

रोहित शर्माचे शतक म्हणजे विजयाची गॅरेंटी, जाणून घ्या या आठ कसोटी सामन्यांची सुफळ कहाणी... https://ift.tt/3l3JMpj

लंडन : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं तर भारतीय संघाला विजय मिळण्याची शंभर टक्के गॅरेंटी असते. ही गोष्ट आता सिद्धही झाली आहे. कारण गेल्या आठ सामन्यांमध्ये जेव्हा रोहितने शतक झळकावलं आहे तेव्हा भारताला विजय मिळालेला आहे. रोहितची आतापर्यंतची शतकं आणि भारताच्या विजयाचे कनेक्शन पाहा...२०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता कसोटीत पदार्पण केले होते. रोहितने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. तो सामना भारताने एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला होता. त्यानंतर २०१३ मुंबई कसोटीत नाबाद १११ धावा केल्या होत्या. तोदेखील सामना भारताने एक डाव आणि १२६ धावांनी जिंकला होता. तिसरे शतक झळकायला चार वर्षे लागली. २०१७च्या नागपूर कसोटीत त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १०२ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना एक डाव आणि २३९ धावांनी जिंकला होता. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला उतरण्याची जबाबदारी मिळाली. विशाखापट्टणममध्ये सलामी करताना रोहितने पहिल्या डावात १७६ धावा आणि दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या. भारताने हा कसोटी सामना २०३ धावांनी जिंकला. त्यानंतर रांची कसोटीत रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१२ धावांची खेळी खेळत कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. या कसोटीत भारताने आफ्रिकेवर एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवला. रोहित शर्मा पुन्हा एकदा मालिकावीर ठरला. रोहितने यावर्षी फेब्रुवारीमध्ये चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतक झळकावले. रोहितने १६१ धावांची खेळी खेळली आणि भारताने इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव केला. म्हणजेच, जेव्हाही रोहितने शतक केले आहे, तेव्हा भारताने सामना जिंकला आहे. सामनावीर पुरस्कार स्विकारल्यावर रोहित म्हणाला की, " माझ्यापेक्षा जास्त सामनावीराच्या पुरस्कारासाठी शार्दुल ठाकूर हा लायक आहे, असे मला वाटते. माझ्यासाठी हे शतक नक्कीच खास आहे. कारण या शतकामुळे भारताला विजय मिळाला आहे. भारतीय संघाला सुस्थितीत मी आणू शकलो, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. मैदानात खेळत असताना मी जास्त काळ खेळपट्टीवर कसा राहीन, याचा विचार मी करत होतो. त्यावेळी शतक पूर्ण करण्याचा विचार माझ्या मनातही नव्हता. पण खास रणनीती आखून मैदानात खेळत राहिलो आणि शतक पूर्ण झाले. माझे हे शतक भारताच्या विजयासाठी कामी आले, या गोष्टीचा मला सर्वात जास्त आनंद आहे."


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tma1ux

No comments:

Post a Comment