Breaking

Saturday, October 9, 2021

लखीमपूर हिंसाचार: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अखेर अटक https://ift.tt/3mH00VW

नवी दिल्ली: प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा याला अखेर १२ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी आशिष याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ( ) हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गंभीर आरोप आहेत. याप्रकरी उत्तर प्रदेश पोलिसांकडून आज सकाळपासूनच मिश्रा याची चौकशी करण्यात येत होती. मात्र चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी १२ तासांनंतर पुढचे पाऊल उचलत आशिष मिश्रा याला अटक केली आहे. लखीमपूर खेरी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचे पोलीस महानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. आशिष मिश्रा यांची प्रदीर्घ काळ चौकशी करण्यात आली. त्यात ते सहकार्य करायला तयार नाहीत. पोलिसांच्या प्रश्नांना ते प्रतिसाद देत नसल्यानेच त्यांना अटक करण्यात आली आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AvlCtg

No comments:

Post a Comment