नवी दिल्ली: देशातील ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक झालीअसून या स्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या कार्यसमितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान यांनी भूषविले. या बैठकीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस पक्ष काम करेल असा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी सोनिया गांधींच्याच नावाला पसंती दिल्याची माहिती कांग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी सांगितले. आम्हा सर्वांना सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर दिली. (it was decided at the meeting of the congress working committee that will lead the congress at present) बैठकीनंतर मात्र काँग्रेस नेते यांनी माहिती देताना सांगितले की, यापुढे काँग्रेसचे नेतृत्व यांनी करावे असे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे. मात्र, काँग्रेसचा अध्यक्ष २० ऑगस्टला होणाऱ्या पक्षाच्या पुढील निवडणुकीत निवडला जाईल, अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांना वाटते की गांधी घराण्यामुळे पक्ष कमकुवत होत आहे. जर सर्वांचे हे मत असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार आहोत. या बैठकीत सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची माहितीही सूत्रांनी दिली. काँग्रेसला मजबूत करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेस एप्रिलमध्ये चिंतन शिबिर आयोजित करणार आहे. तर, पंजाबच्या पराभवाची जबाबदारी घेत हरीश चौधरी म्हणाले की, पंजाबच्या पराभवाची जबाबदारी मी घेत असून आम्ही पुन्हा नवी रणनीती ठरवून लढू. आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. क्लिक करा आणि वाचा- राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी काँग्रेसमध्ये बदलाची मागणी तीव्रतेने होत असून या संदर्भात काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनीही राहुल गांधींनी पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे म्हटले आहे. माझ्यासारख्या कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोन वर्षांपूर्वी जी-२३ सदस्यांनी लिहिलेले पत्र शेअर केले होते. पत्रात सर्व सदस्यांनी संघटना बदलण्याची मागणी केली असून, असे केल्याने परिस्थिती अधिक चांगली होईल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतर फारसा बदल झालेला दिसून आला नाही. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OpIcexU
No comments:
Post a Comment