रोहित शर्मा भारताकडून टी-२० सामना खेळण्यासाठी खूप दिवसांनी मैदानात आला. तो येताच शून्यावर बाद झाला. मोहालीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या टी-२० सामन्यात तो धावबाद झाला. रोहितचा धावबाद अत्यंत दुर्दैवी होता. टीम इंडियासाठी या मॅचमध्ये रोहितसोबत शुभमन गिल सलामीला आला होता. शुभमन २३ धावा करून बाद झाला. यापूर्वी अफगाणिस्तानने भारताला १५९ धावांचे लक्ष्य दिले होते. अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित-शुबमन सलामीला आले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शॉट खेळून रोहित धावा काढण्यासाठी धावला. रोहितने शुभमनकडे लक्ष दिले नाही की तो पळाला आहे की नाही. शुभमन बॉलकडे बघत राहिला. पण तोही रोहितला हाताने थांबण्याचा इशारा करत होता. दरम्यान, अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी संधीचा फायदा घेत स्ट्राईक एंडला रोहितला धावबाद केले. अशात रोहित शून्यावर धावबाद झाला. आऊट झाल्यावर रोहित खूप रागावलेला दिसत होता. हातवारे करून शुभमनला अनेक गोष्टी सांगत तो पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. रोहित बाद झाल्यानंतर शुभमनने काही काळ फलंदाजी केली. यानंतर तोही बाद झाला. दरम्यान मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १७.३ षटकात विजय मिळवला. भारतासाठी, शिवम दुबेने ४० चेंडूत ५ चौकार आणि ०२ षटकारांच्या मदतीने ६०* धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय जितेश शर्माने ३१ धावा केल्या. या कालावधीत मुजीबने अफगाणिस्तानकडून सर्वाधिक २ विकेट घेतल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RCFDGkr
No comments:
Post a Comment