Breaking

Monday, October 10, 2022

संवेदनशील परतवाड्यात पुन्हा तणाव, 'गुनाहे नबी की एक ही सजा सर तनसे जुदा" घोषणेवरुन भाजप आक्रमक https://ift.tt/398lrRL

अमरावती: जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून अचलपूर, परतवाडा दोन्ही शहर सर्वत्र परिचित आहे. येथे काही लोकांकडून झेंडा लावण्यावर वारंवार वाद निर्माण केला गेला गेल्याची घटना ताजी होती. काल झालेल्या ईद सणानिमित्त काढलेल्या जुलूसमध्ये पोलिसांसमोर "गुनाहे नबी की एक ही सजा सर तनसे जुदा" हा नारा लावण्यात आल्या असून या प्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदता चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वादग्रस्त नारेबाजीमुळं परतवाडामध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चौधरी यांनी म्हटलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना व पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांना तक्रार देत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा हा मागील काही महिन्यांपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने सातत्याने चर्चेत आहे. नुपूर शर्मा प्रकरणात अमरावती येथील मेडिकल व्यवसाय उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपुरात अशा प्रकारे धमकीजन्य नारे दिल्यानंतरही ठाणेदार संतोष टाले यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप निवेदिता चौधरी यांनी केला. याच पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांची भेट घेत निवेदन दिले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली व उदयपूर येथील कन्हैय्यालाल यांची हत्या केल्यावर सुध्दा व्हायरल व्हिडीओ मध्ये त्यांच्या मारेकऱ्यांनी हाच नारा लावला होता. देशात कट्टरपंथीय ईस्लामी लोकांकडून सर्वदूर अशा पध्दतीचे वातावरण निर्माण केलं जात आहे व निर्दोष हिंदूंची हत्या करण्यात येत आहे, असे प्रकार सुरु आहेत. "गुनाहे नबी की एक ही सजा सर तनसे जुदा" अशी घोषणाबाजी होऊन देखील स्थानिक थानेदार संतोष टाले यांच्याकडे तक्रार केली असता यांच्याकडून त्वरीत कोणतीही कारवाई केली जात नाही व उडवाउडवीचे उत्तर दिले जाते, असा आरोप चौधरींनी केला. शहरातील हिंदू समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर काही कर्मचारी राजकिय पक्षाच्या एका विशिष्ट समुदायाच्या शुभेच्छा पोस्टरवर त्यांचे फोटो असतात त्यामुळे यांचे त्या समुदायासोबत व राजकियदृष्ट्या प्रेशर वापरून एका विशिष्ट समुदायाचे रक्षण करतात, असा आरोप निवेदिता चौधरी यांनी केला आहे. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी सुद्धा निवेदिता चौधरी यांनी केली. गुन्हे दाखल केले : संतोष टाले या संदर्भात माहिती देताना परतवाडाचे ठाणेदार संतोष टाले म्हणाले की या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही काही लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. आम्ही याची माहिती कंट्रोल रूमला सुद्धा देण्यात आली आहे, असं संतोष टाले म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lHXBGt

No comments:

Post a Comment