Breaking

Friday, June 16, 2023

अतयत भयकर Cyclone Biparjoyच वधवस थपवणयत यश मसळधर पवसच तडख https://ift.tt/WYgF7Se

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : 'बिपर्जय' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेल्या या चक्रीवादळामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती शुक्रवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) महासंचालक अतुल कारवाल यांनी दिली. चक्रीवादळाच्या तडाख्याने २३ जण जखमी झाले असून, कच्छ-सौराष्ट्र विभागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले. या भागांतील एक हजारांपेक्षा जास्त गावे अंधारात असून, ५१२० इलेक्ट्रिक खांब वादळाने कोसळले आहेत.अरबी समुद्रातील चक्रीवादळाने आलेल्या पावसाने गुरुवारी कच्छ आणि गुजरातच्या सौराष्ट्र भागातील काही भागांना झोडपून काढले. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून हे चक्रीवादळ जखाऊ बंदराजवळ धडकण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण कच्छ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. 'लँडफॉल'ची प्रक्रिया पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू होती. 'एनडीआरएफ'चे महासंचालक अतुल कारवाल यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले, 'चक्रीवादळाचा तडाखा बसण्यापूर्वी दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता; परंतु गुजरातमध्ये ते धडकल्यानंतर एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. गुजरात प्रशासन आणि इतर यंत्रणांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे जीवित व वित्तहानी कमी झाली आहे. चक्रीवादळामुळे २३ लोक जखमी झाले आहेत. राज्यातील सुमारे एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडित होत असलेल्या या गावांपैकी सुमारे ४० टक्के गावे कच्छ जिल्ह्यातील आहेत. तेथे चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.' असे झाले नुकसान- चक्रीवादळात २३ जण जखमी; जीवितहानी नाही- सीमाभागातील रस्त्यांचे मोठे नुकसान, मुसळधार पावसाचा तडाखा- चक्रीवादळाने ५१२० विजेचे खांब पडले.- एकूण ४६०० गावे अंधारात; त्यापैकी ३८५० गावांतील वीजपुरवठा पूर्ववत- 'एनडीआरएफ'कडून रूपेन बंदर येथे १२७ जणांची सुटका- विविध ठिकाणी ७०० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली.- विविध भागांतील ५०० कच्ची घरे आणि झोपड्यांचे नुकसान- 'एनडीआरफ'च्या एकूण १८ तुकड्या पडलेली झाडे हटविण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यरत पाकिस्तानात धोका टळलावृत्तसंस्था, कराची : गुजरातमध्ये धडकल्यानंतर कमकुवत झालेल्या ‘बिपर्जय’ चक्रीवादळाचा फटका पाकिस्तानला बसला असून, मात्र, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची कोणतीही नोंद नाही. चक्रीवादळाचा धोका आणि मान्सूनच्या पावसाचा इशारा देणारे सिंधच्या किनारपट्टीवरील केटी शहरातील लोक आता आपापल्या घरी परतत आहेत, असे पाकिस्तान हवामान खात्याने (पीएमडी) म्हटले आहे. ‘चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी पाकिस्तान तयार होता. सुजावलसारख्या सिंधच्या किनारपट्टीभागात समुद्राची पातळी वाढली असली तरी बहुतांश लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे,’ अशी माहिती हवामान विभागाच्या मंत्री शेरी रेहमान यांनी दिली. पाकिस्तानात वेळीच ६७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले, त्यामुळे मोठा धोका टळल्याचे रेहमान यांनी सांगितले. सिंध प्रांतातील विविध भागांमध्ये ३९ छावण्या कार्यरत असून, शेकडो नागरिक या छावण्यांमध्ये आश्रयाला आहेत. राजस्थानमध्येही पाऊसजयपूर : ‘बिपर्जय’ चक्रीवादळामुळे शुक्रवारी राजस्थानच्या जालोर, बारमेर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी रात्रीपासून या भागांत पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत अनेक भागात ७० ते ८० मिलिमिटर पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीही या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, अनेक भागांत २०० मिलिमीटर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.पंतप्रधानांकडून आढावानवी दिल्ली : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. सरकारी निवेदनातून त्यांनी गिर जंगलातील सिंह आणि अन्य वन्य प्राण्यांबद्दल चिंताही व्यक्त केली. दरम्यान, बाधितांना रोख रक्कम, घरगुती वस्तू, निवारा पोहोचवण्याचे आदेश भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.दरम्यान, ‘गुजरातमध्ये अंदाजे ५०० कच्ची घरे किंवा झोपड्यांचे नुकसान झाले आहे. सुमारे ८०० झाडे उन्मळून पडली आहेत. ‘एनडीआरएफ’ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) कर्मचारी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी काम करीत आहेत. बहुतांश भागांत इंटरनेट सेवा खंडित झाली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे,’ असे ‘एनडीआरएफ’चे महासंचालक अतुल कारवाल यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/txNLX6q

No comments:

Post a Comment