अहमदाबाद : हार्दिक पंड्याचा गेल्या सामन्यात शुभमन गिलने टॉसच्यावेळी अपमान केला होता. त्यामुळे आता या सामन्यात हार्दिक पंड्याबरोबर टॉसच्यावेळी काय घडतं, याकडे सर्वांचंं लक्ष होतं. यावेळी श्रेयस अय्यर हा हार्दिकबरोबर टॉसला आला होता. पण हार्दिकबरोबर श्रेयसने यावेळी काय केलं, हे आता समोर आलं आहे.
शुभमन गिलने कसा केला होता, हार्दिकचा अपमान...
गेल्या सामन्यात हार्दिक आणि गिल हे दोघे टॉससाठी आले होते. हार्दिकने टॉस जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसनंतर दोन्ही कर्णधार एकमेकांसमोर येतात आणि हस्तांदोलन करतात. हा नियमच आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याने हात मिळवण्यासाठी गिलच्या पुढे हात सरसावला. पण त्याचवेळी गिलने हात मिळवण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळाले. गिलने हात न मिळवत हार्दिकचा अपमान केला होता. या गोष्टीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर हार्दिकनेही जेव्हा गिल बाद झाला तेव्हा या अपमानाचा बदला घेतला होता.श्रेयसने हार्दिकबरोबर केलं तरी काय, पाहा...
या सामन्यात हार्दिक पंड्याबरोबर श्रेयस अय्यर टॉसला आला होता. त्यावेळी टॉस झाला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकला. श्रेयसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिक श्रेयसकडे पाहत होता की, तो नेमकं करतोय तरी काय. पण श्रेयसने यावेळी फक्त हार्दिकशी हात मिळवला नाही तर त्याने त्याला मिठीही मारली. त्यामुळे हार्दिकही सुखावला आणि चाहत्यांनाही आनंद झाला. कारण मैदानात सामना खेळायचा असतो तो खेळभावनेने, हे सर्वात महत्वाचे असते. ही खेळभावना गिलने दाखवली नाही, त्यामुळे तो जोरदार ट्रोल झाला होता. पण श्रेयसने मात्र तसे केले नाही. त्यामुळे या टॉसनंतर चाहत्यांनी श्रेयसचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना करो या मरो, असाच असणार आहे. कारण हा सामना जो जिंकेल त्यांना फायनलमध्ये पोहोचता येणार आहे, तर जो संघ पराभूत होईल त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. पावसामुळे जर हा सामना रद्द झाला तर काय होऊ शकते, याचा नियमही आता समोर आला आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5vj2Yzb
No comments:
Post a Comment