नवी दिल्ली: सौम्य आणि रीमा यांच्या लग्नाला फक्त पाच दिवस झाले होते. 26 वर्षांचे सौम्य शेखर साहू हे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होते. घरात सून आल्यामुळे सगळे खूप आनंदी होते. रीमा किचनमध्ये वांग्याचे भरीत आणि डाळ बनवत होती. 23 फेब्रुवारी 2018 ला दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या घराची डोअर बेल वाजली. सौम्यने दरवाजा उघडला, तेव्हा त्याला समोर कुरियर बॉय दिसला. कुरियर बॉय एक पार्सल घेऊन आला होता. सौम्यला वाटले की त्याच्या मित्रांनी लग्नाची भेट पाठवली असेल. कारण त्याचे काही मित्र लग्नाला येऊ शकले नव्हते. पार्सलवर सौम्यचे नाव लिहिले होते. ते पार्सल एस.के. शर्मा नावाच्या व्यक्तीने पाठवले होते, जो होता. सौम्यने पार्सल घेतले आणि तो रीमाला आवाज देत किचनमध्ये गेला. पण, पाटनगडपासून जवळपास 230 किलोमीटर लांब असलेल्या रायपूरमध्ये एस. के. शर्मा नावाचा आपला कोणता मित्र आहे, हे त्याला लक्षात येत नव्हते.हिरव्या रंगाच्या कागदात गुंडाळलेल्या त्या पार्सलमधून एक पांढरा दोरा बाहेर आलेला दिसत होता. आवाज ऐकून सौम्यची आजी देखील किचनमध्ये आली. त्यांनाही उत्सुकता होती की हे गिफ्ट कोणी पाठवले आहे. सौम्यने पाकीट उघडण्यासाठी जसा तो पांढरा दोरा ओढला, तसा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की किचनच्या छताचेही नुकसान झाले. सौम्य, रीमा आणि त्यांची आजी या घटनेत गंभीर जखमी झाले आणि तिथेच कोसळले. ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील पाटनगड गावात ही घटना घडली.
तो जीवघेणा पार्सल कोणी पाठवला?
आवाज ऐकून शेजारी धावून आले आणि त्यांनी या तिघांना रुग्णालयात दाखल केले. सौम्य आणि त्याची आजी दोघेही मोठ्या प्रमाणात होरपळले होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सौम्यची पत्नी रीमाही गंभीर जखमी झाली होती. या घटनेने सगळ्या देशाला हादरवून सोडले. सौम्यचे कोणाशीही वैर नव्हते. जेव्हा रीमाला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा तिने पोलिसांना त्या पार्सलविषयी माहिती दिली.आता प्रश्न होते की, ते पार्सल कोणी पाठवले? का पाठवले? आणि रायपूरचा एस.के. शर्मा कोण होता? . मित्र, नातेवाईक अशा 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली. सौम्यचा मोबाईल, लॅपटॉप तपासले, पण काहीच सुगावा लागला नाही. ज्या कुरियर कंपनीने पार्सल पाठवले होते, पोलीस त्या पत्त्यावरही पोहोचले. पण, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आणि पार्सल स्कॅन करण्याची मशीनही नव्हती. त्यामुळे, पार्सल पाठवणाऱ्याने विचारपूर्वकच हे कुरियर ऑफिस निवडले असावे, असं दिसत होतं. पार्सल पाठवताना खोटे नाव आणि पत्ता लिहिला होता. कुरियर कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली.एक निनावी पत्र अन् तपासाला नवी दिशा
कुरियर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे पार्सल तीन दिवस आधी बुक केले होते. डिलिव्हरी बॉय ते पार्सल देण्यासाठी गेला होता, पण तिथे लग्नाचं रिसेप्शन सुरु होतं. त्यामुळे, तो परत आला आणि तीन दिवसांनी ते पार्सल सौम्यच्या घरी पोहोचले. म्हणजेच तो जीवघेणा पार्सल लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पाठवण्यात आला होता. खूप तपास करूनही पोलिसांना काहीच सुगावा मिळत नव्हता. हे प्रकरण पूर्णपणे एक रहस्य बनले होते. तेवढ्यात बलांगीरच्या एस.पी. (SP) ऑफिसमध्ये एक निनावी पत्र आले आणि .एस.पी. (SP) यांच्या नावे पाठवलेल्या त्या पत्रात लिहिले होते की, "हे पत्र तुमच्यापर्यंत एका खास माणसाने पोहोचवले आहे. तो बॉम्ब असलेला पार्सल एस.के. सिन्हाच्या नावाने पाठवला होता, एस.के. शर्माच्या नावाने नाही. हे काम तीन लोकांनी मिळून केले आहे आणि ते तिघेही तुमच्यापासून खूप दूर आहेत. पोलीस त्यांना पकडू शकत नाहीत. त्यांनी विश्वासघात केल्यामुळे हा स्फोट घडवला. आम्हाला माहीत आहे की पोलिसांकडे जाऊन काही उपयोग नाही, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. त्या पूर्ण कुटुंबाला संपवलं तरी आमच्या नुकसानाची भरपाई होऊ शकत नाही. कृपया या प्रकरणात लक्ष घालू नका आणि निरपराध लोकांना त्रास देणे बंद करा."या निनावी पत्रामुळे पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा मिळाला. क्राइम ब्रँचने हे प्रकरण हाती घेतले. त्या पत्राच्या मदतीने पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. दुसऱ्या दिवशी क्राइम ब्रँचचे अधिकारी सौम्यच्या आई-वडिलांकडे गेले आणि त्यांना ते पत्र दाखवले. सौम्यची आई एका कॉलेजमध्ये शिक्षिका होती. त्यांनी ते पत्र अनेक वेळा वाचले आणि त्यांना आठवले की पत्रातील शब्द आणि लिहिण्याची पद्धत त्यांच्या कॉलेजमधील एका इंग्लिश टीचरशी मिळतेजुळते आहे. त्या टीचरचे नाव पुंजीलाल मेहर होते. सौम्यच्या आईने सांगितले की, मागच्या वर्षी पुंजीलालला काढून त्यांना प्रिंसिपल बनवण्यात आले होते, त्यामुळे तो खूप नाराज होता.पोलिसांनी आता सगळ्या गोष्टी जुळवायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांनी पुंजीलालला चौकशीसाठी बोलावले. सुरुवातीला त्याने पोलिसांना खोटी माहिती देऊन प्रकरण गुंतवण्याचा प्रयत्न केला. पण, जेव्हा पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने सारं सत्य सांगितलं. तो पार्सल पुंजीलाल मेहरनेच पाठवला होता.पुंजीलाल 1996 मध्ये कॉलेजमध्ये इंग्लिश टीचर म्हणून जॉईन झाला होता. 2014 मध्ये त्याला प्रिंसिपल बनवण्यात आले. पण, जेव्हा त्याला काढून सौम्यच्या आईला प्रिंसिपल बनवले, तेव्हा त्याला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि त्याने बदला घेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी चौकशी केल्यावर पुंजीलालने सांगितले की, त्याने ऑक्टोबर महिन्यापासून फटाके खरेदी करायला सुरुवात केली आणि त्यातील बारूद काढून जमा केले. त्या बारुदाने त्याने बॉम्ब बनवला आणि तो एका कार्डबोर्ड बॉक्समध्ये (Cardboard box) टाकून गिफ्ट-रॅप केला.फेब्रुवारी महिन्यात सौम्यचे लग्न असल्याचं पुंजीलालला कळालं. त्याने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लग्नाचा दिवस निवडला. लग्नाच्या एक आठवडा आधी, कॉलेजमधून घरी गेला आणि आपला मोबाईल सोडून निघाला. मग तो गिफ्टघेऊन बाहेर पडला. त्याने मोबाईल घरी यासाठी ठेवला, जेणेकरून पोलिसांनी चौकशी केल्यास तो सांगू शकेल की तो त्या दिवशी घराबाहेर गेलाच नव्हता. त्यानंतर तो रेल्वे स्टेशनवर गेला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी तो तिकीट न काढताच रायपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला.रायपूरला पोहोचल्यावर त्याने असे कुरियर ऑफिस शोधले, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते आणि पार्सल स्कॅन करण्याची मशीनही नव्हती. त्याने खोटे नाव आणि पत्ता देऊन पार्सल बुक केले आणि त्याच संध्याकाळी तो परतला. त्यानंतर तो सौम्यच्या लग्नाला गेला आणि तीन दिवसांनी बॉम्बस्फोटात त्याचा मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्कारालाही पोहोचला. त्याला सौम्यच्या पूर्ण , असे त्याने सांगितले.पुंजीलालची प्लॅनिंग खूप चांगली होती आणि पोलीस त्याच्यापर्यंत कधीच पोहोचू शकले नसते. पण, त्यानेच आपली माहिती पोलिसांच्या हाती त्या निनावी पत्राद्वारे पाठवली. या प्रकरणी कोर्टाने 28 मे 2025 रोजी, म्हणजे सात वर्षांनंतर पुंजीलाल मेहरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hUPzm2w
No comments:
Post a Comment