Breaking

Thursday, March 17, 2022

धक्कादायक! फक्त मोबाईल चार्जिंगवरून वाद झाला, थेट हत्याच केली https://ift.tt/5DFqQZf

ठाणे : मोबाईल चार्जिंगचा सोडवणे एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. ठाण्यातील वर्तकनगरमध्ये करण्यावरून दोन जणांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या तरुणावर राग मनात धरून आपल्या साथीदारांच्या मदतीने काटा काढण्यासाठी त्याच्यावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. (a person lost life after a dispute over in of ) ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ मार्च रोजी साहिल कांबळे आणि अभिषेक केसरकर या दोघांचा लोकमान्य नगर पाडा नं ३ मध्ये राहणाऱ्या जगदीश समुद्रे याच्यासोबत मोबाईल चार्जिंग करण्यावरून वाद सुरु झाला. मात्र खूप वेळापासून सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी सुमित राऊत त्या ठिकाणी पोहचला आणि भांडण मिटवले. मात्र मध्यस्थी केल्याचा राग साहिल आणि अभिषेक यांच्या मनात होता. सुमितला धडा शिकवण्यासाठी साहिल आणि अभिषेक या दोघांनी आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने काटा काढण्याचे ठरवले. यावेळी साहील आणि अभिषेक याने राज वंजारी आणि अन्य दोन अनोळखी आरोपींची संगनमत करीत मध्यस्थी सुमित याच्यावर धारदार शस्त्राने सपसप वार केले. त्यात सुमित हा गंभीर जखमी सुमितला उपचारासाठी वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी सुमितला मृत घोषित केले. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्वरित हत्येप्रकरणी आरोपी राज वंजारी, साहिल कांबळे आणि अभिषेक केसरकर या तिघांना अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- या सर्व प्रकरणामध्ये सुमित राऊत याचे नातेवाईक आक्रमक झाले असून आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. नाहीतर आरोपीना आमच्या ताब्यात द्या आमच्या मुलाच्या खुनाचा बदला आम्ही घेऊ अशी देखील आक्रमक प्रतिक्रिया सुमितच्या पालकांची आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/krSGKI7

No comments:

Post a Comment