बीड: शहरात खुनाचे सत्र सुरूच असून दोन दिवसांत बीड जिल्ह्यात दोन युवकांचे खून झाले आहेत. यामध्ये एकाचा खून काल दुपारच्या वेळेला बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात दगडांनी ठेचून झाला. तर आज गेवराई येथे दोन गटातील भांडणांमध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. (A youth has been murdered in Gevrai) दोन गटात झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली असून या खळबळ माजवणाऱ्या घटनेचे नेमके कारण समजलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, ही घटना संजयनगर भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन गटात किरकोळ कारणावरून भांडण झाले. भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून , या घटनेत मयत बाबू शिवराम शेलुरे , ( वय वर्ष २४ ) या युवकाचा खून झाल्याचे समजते. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान , बाबू शेलुरे या युवकाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची चर्चा आहे. कालच दुपारी बीडमध्ये खंडेश्वरी परिसरात युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या लागोपाठ घडलेल्या गंभीर घटनांनंतर बीड जिल्ह्यातील भय नेमके संपेल कधी, हा प्रश्न नागरिक प्रशासनाला विचारताना दिसत आहेत. सतत वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MYymCs1
No comments:
Post a Comment