
विनायक राणे : आणि हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर निवृत्ती घेतील, अशी जोरदार चर्चा सुरु होती. पण फायनलच्या सामन्यापूर्वी भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीबाबत चर्चा झाली की नाही, हे आता समोर आले आहे.भारताने टी २० वर्ल्ड कप जिंकल्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती जाहीर केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसीची मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कपही म्हटले जाते. त्यामुळे ही मानाची स्पर्धा जिंकून रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करतील, अशा चर्चांनी जोर धरला होता, पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी ड्रेसिंग रुममध्ये याबाबत बोलणं सुरु होतं की नाही, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीच्या पूर्वसंध्येस भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडेतून निवृत्ती घेतील, अशा चर्चेने जोर धरला आहे. मात्र उपकर्णधार शुभमन गिलने या सगळ्या चर्चांना तूर्तास विराम देण्याचा प्रयत्न करत, ‘ड्रेसिंग रूममध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नाही’, असे स्पष्ट केले. शनिवारी पत्रकार परिषदेत गिलने याबाबत सांगितले. भारतीय संघ चॅम्पियन्स स्पर्धेत विजेता ठरल्यास रोहित, विराट वनडे क्रिकेटचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. ‘आमच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट, रोहितच्या निवृत्तीविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही’, गिल मोजक्याच शब्दांत उत्तर देतो. या चर्चेपेक्षाही वर्ल्ड कप टी-२०नंतर आयसीसीची आणखी एक स्पर्धा जिंकण्याच्या दबावाबाबत त्याने भाष्य केले. ‘भारतीय संघ फायनलसाठी आतुर आहे. गेल्यावेळी आम्हाला वर्ल्ड कप वनडे स्पर्धा जिंकता आली नव्हती. यावेळी मात्र आम्ही आणखी दृढ निश्चयासह मैदानात उतरणार आहोत’, असे गिल म्हणाला. आयसीसीच्या स्पर्धांमधील बाद फेऱ्या तसेच अंतिम फेरीच्या दडपणाशी दोन हात करत भारतीय संघ जेतेपदाचा करंडक उंचावेल, असा विश्वासही गिलने व्यक्त केला. ‘असे मोठे सामने दडपण असणारच... मात्र असे दबाबाचे क्षण हाताळण्यात यशस्वी ठरणारा संघ अंतिम विजेता ठरतो. अतिरिक्त दडपण न घेता, नियमित सामन्याप्रमाणेच आम्ही या फायनलकडे बघत आहोत. यशस्वी संघाचे तेच लक्षण आहे. या मैदानावर आम्ही चार सामने खेळलो आहोत. त्यामुळे आमच्यावर अतिरिक्त दडपण नाही’, असे गिलने सांगितले. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी गिलने इतिहासातील काही सामन्यांचे उदाहरणही दिले. ‘ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज या संघांनी बादफेरीत कायमच सर्वोत्तम खेळ करत बड्या सामन्यांमध्ये येणाऱ्या दडपणावर मात केली आहे. अर्थात हे सांगणे सोपे असले तरी त्याची अंमलबजावणी करणे कठीण आहे. कसलेल्या संघाला ही कला छान अवगत असते’, असे गिल म्हणाला. शुभमन गिल पुढे म्हणाला की, " आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांच्या खांद्याला खांदा लावून खेळता येत असल्याचा अभिमान आहे, रोहित हा सलामीच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी असून विराटच्या कामगिरीबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही, भारतीय संघात कायमच आघाडीच्या फलंदाजांना स्वातंत्र दिले जाते. "
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2A5B0kX
No comments:
Post a Comment