मुंबई- टीव्हीवरील सुपरहिट शक्तीमान म्हणजेच अभिनेते यांचा जन्म 23 जून 1958 रोजी झाला. शक्तीमान व्यतिरिक्त, त्यांनी बीआर चोप्रांच्या महाभारतात भीष्म पितामहंची भूमिका देखील उत्तम साकारली होती. 90 च्या दशकातील मुलांमध्ये त्यांच्या बालपणी शक्तीमानची प्रचंड क्रेझ होती. त्यावेळी या शोला भरपूर पसंती मिळाली होती, पण तुम्हाला माहिती आहे का की हा शो उधारीवर बनवला गेला होता. 'शक्तीमान' 1997 ते 2005 पर्यंत डीडी नॅशनलवर प्रसारित व्हायचा. 'शक्तीमान' या शोमध्ये मुकेश खन्नांनी प्रमुख भूमिका साकरली होतीच पण शिवाय ते या शोचे निर्माते देखील होते. या शोद्वारे त्यांना प्रत्येक घरात ओळख मिळाली. जेव्हा त्यांनी हा शो बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्याकडे त्यासाठी पैसे नव्हते. हा शो बजेटबाहेर जात होता मुकेश खन्ना प्रथम शक्तीमानची कल्पना घेऊन राजश्री प्रोडक्शनकडे गेले. त्यांना ही कल्पना आवडली. त्यानंतर मुकेश खन्ना यांनी त्यांची कल्पना दूरदर्शनला सांगितली. तिथेही त्यांना ग्रीन सिग्नल देण्यात आला. पण तरीही पुढे जाण्याचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. हा सुपरहिरो शो बनवण्यासाठी खूप पैसे खर्च होणार होते, पण मुकेश खन्ना मागे हटले नाहीत. मित्रांकडून कर्ज घेतले हा शो बनवण्यासाठी त्यांचा मित्र जतिन जानीकडून 8 लाख रुपये उसने घेतले. जतिनने मुकेशला 50 टक्के भागीदारी मागितली, पण मुकेशने याला सहमती दर्शवली नाही. त्यांनी 8 ऐवजी 16 लाख रुपये जतिनला परत केले. त्यानंतर अंबु मुरारकाने मुकेश अंबानीला 75 लाख रुपये व्याजाशिवाय दिले. मुकेशने दोन वर्षांनी ही रक्कम त्यांना परत केली. कर्मचाऱ्यांकडूनही कर्ज घेतले मुकेश खन्ना यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, शो बनवण्यासाठी त्यांना मालिकेतील कर्मचाऱ्यांकडून पैसे उधार घ्यावे लागले. त्यांनी सांगितले होते की त्यांना एका एपिसोडचे शूटिंग करण्यासाठी 4-5 दिवस लागत होते. एकदा एका कठीण स्टंटमुळे त्यांना एका एपिसोडचे शूटिंग करण्यासाठी 21 दिवस लागले. इतके दिवस शूटिंग केल्यामुळे त्यांचे बजेट डळमळीत झाले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे देऊन मदत केली. नंतर पैसे कर्मचाऱ्यांना परत करण्यात आले. हा शो का बंद करण्यात आला पण, एकेकाळी मुकेश यांना हा सुपरहिट शो बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. इतक्या हिट शो का बंद करण्यात आला हे अनेकांना समजले नाही. याबद्दल बोलताना मुकेश यांनी त्याच्यां यूट्यूब चॅनलवर सांगितले होते- 'जेव्हा शक्तीमान सुरू झाला तेव्हा मी दूरदर्शनच्या मालकाला त्याच्या बदल्यात 3 लाख रुपये देत असे. त्याला प्राइम टाइम मिळत नव्हता, त्याला मंगळवारी रात्रीचा स्लॉट आणि शनिवारी दिवसाचा स्लॉट मिळत असे. हा शो दिवसा यायचा, त्यामुळे मुले शाळा बंक करू लागली, जरी मालिका हिट झाली तरी माझे कोणतेही नुकसान झाले नाही. काही काळानंतर मला रविवारी 12 वाजता स्लॉट मिळाला. मालिका हिट झाली, म्हणून चॅनेलने माझ्याकडून 7 लाख रुपये मागितले. मी ते द्यायचो पण जेव्हा त्यांनी 10 लाख रुपये मागितले तेव्हा मी तेवढे पैसे देऊ शकलो नाही. चॅनेलशिवाय मला इतर गोष्टीही पहाव्या लागल्या. कंटाळून मला मालिका बंद करावी लागली.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vnoFajX
No comments:
Post a Comment