अहमदाबाद : आरसीबीने अखेर १८ व्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आणि विराट कोहलीचे स्वप्न साकार झाले. आरसीबीने पंजाब किंग्सवर आयपीएलच्या फायनमलध्ये विजय ६ धावांनी साकारला आणि त्यांनी प्रथम विजेतेपदाला गवसणी घातली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली असली तरी त्यानंतर त्यांचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत राहीले. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आरसीबीने त्यानंतर अचूक आणि भेदक मारा करत सामन्यावर वरचष्मा ठेवला होता.आरसीबीच्या १९१ धावांचा पाठलाग करताना पंजाबने सुरुवात चांगली केली होती. त्यांना ४३ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर त्यांचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि पंजाबच्या हातून सामना निसटतो की काय, असे वाटायला लागले. गेल्या सामन्यात पंजाबच्या विजयाचा हिरो ठरलेला श्रेयस अय्यर या सामन्यात पुरता अपयशी ठरला. कारण यावेळी त्याला फक्त एकच धाव करता आली. आरसीबीच्या संघाने चांगली सुरुवात केली खरी, पण विराट कोहलीची बॅट मात्र शांत होती. फिल सॉल्ट मात्र यावेळी दमदार फटकेबाजी करत होता. पण सॉल्टवर धावगतीचं दडपण वाढलं आणि मोठा फटका मारताना तो १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आला तो मयांक अगरवाल. यावेळी मयांकनेही सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी केली, तो २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार फलंदाजीला आला आणि त्यानेही संघाची धालगीत वाढवण्याचा प्रयत्न केला. रजतने यावेळी २६ धावा केल्या. लायम लिव्हिंगस्टोन २५ आणि जितेश शर्मा २४ यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. पण एकिकडे हे फलंदाज मोठी फटकेबाजी करत असले तरी आरसीबीचा धावसंख्या मात्र हवी तशी वाढत नव्हती आणि त्याला कारण ठरत होते विराट कोहलीचा सावध फलंदाजी.आरसीबीचा संघ फायनलमध्ये २०० धावा करण्याच्या तयारीत दिसत होता. आरसीबी सहजपणे हा पल्ला गाठेल, असे वाटत होते. पण विराट कोहलीच्या सावध पवित्र्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही. कारण विराट कोहलीने ४३ धावा केल्या असल्या तरी त्यासाठी त्याने ३५ चेंडूं खेळले आणि त्याच्या या खेळीत एकही षटकार नसला तरी फक्त तीनच चौकार होते. त्यामुळे आरसीबीला या सामन्यात १९० धावा करता आल्या.पंजाब किंग्सने वेगवान गोलंदाज यावेळी यशस्वी ठरले. अर्शदीप सिंग आणि कायले जेमिन्सन यांनी यावेळी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या. त्यामुळे आरसीबीचा अर्धा संघ या दोघांनीच गारद केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nvj72wS
No comments:
Post a Comment